रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील अंतिम वर्षातील कृषीदूतांनी भाळवणी (ता. पंढरपूर ) येथे ‘ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम ‘ अंतर्गत शेतीविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमांतर्गत प्रथम कृषी सल्ला केंद्राचे उद्टघान सरपंच रणजित जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी कृषी सल्ला केंद्राबद्दल माहिती दिली. तसेच गावात पुढील अडीच महिने राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला जाईल व वेगवेगळी प्रात्येक्षिके करून शेतकऱ्यांना दाखविली जातील. तसेच शिबिरात शेतकरी बांधवांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पिकांची निवड , खत आणि कीटक नाशकांचा योग्य वापर , त्याचबरोबर शेतकऱ्यांमध्ये कृषी क्षेत्रातील नवीन ज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या शेती व्यवसायात सुधारणा याविषयी चर्चासत्र , मेळावे तसेच विविध सामाजिक उपक्रम , वृक्षरोपण अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन कृषिदुतांनी केले.
या कार्यक्रमप्रसंगी उपसरपंच नितीन शिंदे , ग्रामविकास अधिकारी पी . एस . खंडागळे , ग्रामपंचायत सदस्य राजकुमार पाटील , विठ्ठल चौगुले , अर्जुन लिंगे , पोपट इंगोले , प्रवीण गायकवाड , प्रवीण शिंदे , विजय शिंदे , गंगाधर कारंडे , शशिकांत विभुते , महेश शिंदे, विलास माने , बापू माने कृषिदूत विध्यार्थी व शेतकरी बांधव उपस्थित होते.