कोल्हापूर जिल्ह्यात अनेक नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. सोमवार पासून रविवार पर्यंत संपुर्ण सप्ताह विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. सप्ताहानिमित्त विविध उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या राज्याभिषेकाला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात `उत्सव शिवजन्माचा सुराज्य कार्यालयाचा आणि जिजाऊच्या जीवनाचे राज्य जनतेचे’ हा सप्ताह घेतला जाणार आहे.
सोमवारपासून (ता. १२) जिल्ह्यात स्वराज्य पताका लावल्या जाणार, सेल्फी वुथ किल्ला, महाराजांचे शपथ पत्र वाटप असे कार्यक्रमही होणार आहेत. रांगोळी, वकतृत्व स्पर्धा, चित्र प्रदर्शन, शिवकालिन वस्तूंचे प्रदर्शन, बाईक रॅलीचे नियोजन केले आहे.
सर्व उपक्रम रविवार (ता. १८) पर्यंत घेतले जाणार आहे, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी सांगितले.